कांद्याचे बी खराब म्हैसगांव व कोळेवाडी मधील प्रकार ; अनेक शेतकरी हैरान.? कशी केली जाती शेतकऱ्याची फसवणूक.

कांद्याचे बी खराब म्हैसगांव व कोळेवाडी मधील प्रकार ; अनेक शेतकरी हैरान.? कशी केली जाती शेतकऱ्याची फसवणूक
.


म्हैसगांव : राहुरी तालुक्याच्या अनेक शेतकऱ्याचे कांदे लावण्यासाठी लगबग सुरू झाली आहे त्यांनी त्या साठी शेती मध्ये कृषी सेवा केंद्र मधून बी घेऊन आले आहे त्यांनी ते बी शेती चे वाफे बाधुन टाकले परंतु त्या बी मधुन एक ही रोप साधे उगवली पण नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान व पैसे गेले हे सर्व सहन करून हैरान झाले आहे हा प्रकार असाच चालू राहिला तर अनेक शेतकरी कांद्यापासून पिका पासुन वंचित राहणार आहे तरी हे कसे उगवणार हा प्रश्न निर्माण झाला आहे .
कोळेवाडी , म्हैसगांव या ठिकाणाचे शेतकरी अनिल नामदेव आंबेकर , दौलत सावित्रा विधाटे यांनी राहुरी येथील विराग कृषी सेवा केंद्र व ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्र मधुन कांदे चे बी २३ /१० /२०२४ रोजी विकत आणले होते पाच दिवसाने ते बी शेती मध्ये वाफे तयार करून टाकण्यात आले होते त्याला पाणी देण्यात आले पण त्यामधील एक ही बी उगवले नाही त्या बी पासुन रोप होणे गरजेचे होते ते तयार झाल्यावर शेती मध्ये रोप लावले गेले असते परंतु कृषी सेवा केंद्रचा व शेतकऱ्याचा खुप खर्च झाला होता परंतु हे बी खराब असल्यामुळे उगवले नाही त्यामुळे हे शेतकारी हैराण झाले आहे या बाबतीत यांनी कृषी अधिकारी राहुरी व कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्या कडे तक्रार केली आहे पण या कृषी सेवा केंद्र वर काही करवाई होते का या कडे शेतकाऱ्याचे लक्ष लागून आहे करवाई झाली नाही तर शेतकाऱ्यांना नुकान भरपाई देणार कोण आस प्रश्न निर्माण झाला आहे असे अनेक शेतकरी आहे परंतु त्यांनी तक्रार दिली नाही . प्रतिनिधी दत्ताजी जोगदंड अँक्टिव्ह मराठी न्यूज राहुरी. अ.नगर







