अहिल्यानगर जिल्ह्यात व शहरांमध्ये आता रेशनिंग मध्ये येतोय प्लास्टिक तांदूळ …. लाखो गरीब लोकांचे मुख्य अन्न असलेला रेशनिंग तांदूळ त्यातच होते मिलावट. नागरिकांचे जीवन झाले धोकेदायक… अँक्टिव्ह मराठी न्यूज अन्न नागरी पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा लवकरच करणार…
जिल्हा विभागीय उपसंपदिका संगीता खिलारी ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यात व शहरांमध्ये आता रेशनिंग मध्ये येतोय प्लास्टिक तांदूळ ….
लाखो गरीब लोकांचे मुख्य अन्न असलेला रेशनिंग तांदूळ त्यातच होते मिलावट. नागरिकांचे जीवन झाले धोकेदायक…
अँक्टिव्ह मराठी न्यूज अन्न नागरी पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा लवकरच करणार…
अहिल्यानगर दिनांक 13 जानेवारी (प्रतिनिधी) संगीता खिलारी .*
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रेशनिंग दुकानांमध्ये मिळत असलेल्या तांदूळ या मधूनच सध्या वाटप चालू असलेल्या रेशनिंग दुकानांमधून नागरिकांना दिला जातोय . रेशनिंग तांदूळ मध्ये मिक्स तांदूळ म्हणजे प्लॅस्टिक तांदूळ यामुळे नागरिकांचे जीवाला धोका आहे .व अनेक आजारांना बळी पडतात . याचमुळे रेशनिंग चे तांदूळ खावे की नाही? असा संभ्रम जनतेमध्ये दिसून येत आहे.याकडे अन्नधान्य पुरवठा अधिकारी केव्हा लक्ष देणार की नाही,जाणून- बुजून घडतोय हा प्रकार? नागरिकांना जीव धोक्यात आहे का? असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा बनला आहे. गोरगरीब नागरिकांनी रेशनिंग दुकानांमधून तांदूळ, गहू घेऊन आपली उपजीविका भागवत असतानाच नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार चालू झालेला दिसत आहे. आता रेशन दुकानांमध्ये रेशन घ्यावे. की नाही मग आजारांचे नेमके कारण काय आहे कशामुळे जनता अनेक आजारांना बळी पडत आहे . या भीतीने तरी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन सर्वसामान्य जनतेमधून होत आहे. यामध्ये अन्नधान्य व नागरी पुरवठा अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून शहानिशा करून चाचणी करणे गरजेचे आहे . त्यानंतरच रेशनचे वाटप नागरिकांपर्यंत व्हावे. असे वक्तव्य नागरिक करत आहेत. गोरगरीब नागरिक प्रतीक्षेत.
खरंच ! यामध्ये कोण ठरणार दोषी ?
नेमकी यात कोणाची चूकआहे लवकरच आपण जाणून घेऊ यात. (प्रतिनिधी) विभागीय उपसंपदिका संगीता खिलारी ॲक्टिव्ह मराठी न्यूज .अहिल्यानगर.







